आठवणीतला एक धडा !

 ( If you find these letters too small press ctrl + mouse scroll up for proper viewing  )
कॉलेजच्या  जल्लोष ने मी आणि माझ्या मित्रांचा उत्साह द्विगुण झाला होता.सकाळी कॉलेज मध्ये येताना  आणि घरी परत जाताना देखील तो उत्साह मावळत नसे.

अशी हि आठवड्यापासून चालेली दिनचर्या .

फार उशिराची गाडी पकडण्यास आम्ही सर्व मित्रमंडळी ट्रेन चा दिशेने धाव गेऊ लागलो आणि आम्ही अखेरची जागा पकडली .
हातात गिटार , कमरेला डिजिटल  कॅमेरा असा एक कॉलेज कुमाराचा पोशाखात मी होतो.

समोर बसलेली व्यक्ती मला भावून गेली..एक एकता लहान हसमुख पोर समोरचा चौथ्या सिट वर बसून आम्हा सर्वांकडे पाहत होता ..
अंगावर साधे केशरी रंगाचे कपडे , निळी चड्डी आणि शर्टचा खिशात घडी घातलेला रुमाल..

माझा मित्र फोटो काढण्यास मग्न होऊ लागला..आमचा ग्रुप फोटो काढत असताना तो  लहान पोर ह्याची मात्र खबर घेत की तो फोटो मध्ये येऊ नये आणि आमचा फोटो काढताना तो  स्वतः बाजूला होत..

हे सर्व पाहून मी खूप भावूक झालो ..त्याचा एक फोटो काढायचा ठरवला आणि हाच तो फोटो ..इतक्या वेळ हा गप्प बसणारा आता त्याचा चेहऱ्यावर हसू उमलू लागले होते ..त्याला हसू आवरतच नव्हते..

ट्रेन आम्हाला घरचा दिशेने नेत होती.

त्या मुलाशी गप्पा मारायला अपोपआप सुरुवात झाली ..

माझा मित्र चौकस ..विचारू लागला "कोणत्या शाळेत रे तू?"

" अम्बानाथ ला १७ नुम्बर चा शालेत " असे गावठी उच्च्चार ऐकून माझे मित्र थोडे हसले .. हा पोर municipality चा शाळेत होता हे  नंतर समजले..

"मग ट्रेन मध्ये काय करतोय?" प्रश्न पूर्ण व्यायचा आतच तो बोलू लागला ..

" चोकलाते विकाया येताव रोज संध्याकाली !"

माझा मित्र अजून प्रश्नाचांचा मारा करत होता ..त्याला हि गम्मत वाटत होती ..त्याची आतुरता त्याला आवरत नव्हती ..बाकीचे मात्र सर्व ऐकतच होते..

" १५० कमवतो रोजचे शाला भी करतो अन संध्याकाली चार तास इथेच जातात ..दलाल ला १०० रुपय द्यावे लागतात आणि उरलेले आई बाबाना "

हे सर्व बोलताना तो किती खुश होता !! त्याची परिस्थिती तो  आनंदाने सांगत होता जणू हेच सर्व त्याल भरपूर होते ..

इथे आम्ही मेमोरी कार्ड  मध्ये स्पेस  नाही म्हणून रडतो आणि हि लोक दोन वेळची भाकरी मिळते म्हणून खुश होतात .

आपले मन हे असेच बनवले आहे आपण .. जिथे पैसा आहे तिथेच  आनंद असा समीकरण बुद्धीत ठसवले आहे ..
हे अजून मानुषाला कळले नाहीये जिथे ऐशो आराम तिथेच आनंद नाही तर संतोष हि नेहमी सर्व परीस्तीथित  हसमुख राहून जन्म दिलेली भावना आहे ..

समाधान हिच आनंदाची आई आणि हीच भावना नेहमी आनंदमयी ठेवण्यास जबाबदार असते.. किती हि खोल जा समुद्र संपत नाही आणि उंच जा आकाश संपत नाही तसेच पैसा ,आराम आणि जीवनाचे आहे मग समाधानाची होडी का चालवत नाही आपण ??

प्रगती करण्यास आणि नवीन गोष्टी साधण्यास काही गैर नाही पण मग त्या साठी आनंदाची का किंमत मोजावी बर?  जी आपल्या हक्काची आहे?

रडून कोणतीच गोष्ट सावरत नाही..हसून तरी कुठे होईल असा प्रश्न निर्माण होतो पण..
सर्व परिस्थितीत हसून तर पहा सर्व गोष्टी आपो आप मागे येतील आणि संकटाचे काळे ढग आपो आप सरकू लागतील  !!

Comments

  1. good attempt..keep it up!!! Nice thouhts!!!!

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलं आहेस , नेहमी लिहितोस का?
    जर हो तर पोस्ट करत राहा
    तुझ्या हक्काचा मी एक नक्की वाचक बनेन

    ReplyDelete
  3. dhanyavaad amey tula update det rahin majha blog cha!!
    thanks ninad!!

    ReplyDelete
  4. Very Nice Amit..Keep It Up..!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

To be or not to be

The opposites

The funny thing about exam results..